सोमवार, २८ सप्टेंबर, २०१५

परीक्षेदरम्यान आरोग्याची काळजी

परीक्षेच्याआधी आपला संपूर्ण अभ्यास झाला असला, तरी मनावर ताण असतोच. या ताणामुळे परीक्षेआधी आजारी पडण्याचा संभव असतो. परीक्षा म्हणजे तुम्ही जे शिकला आहात, ते दुसऱ्यापर्यंत पोहोचविण्याची संधी. या संधीचा उपयोग उत्तम गुण मिळविण्यासाठी केला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेतली पाहिजे. 

परीक्षापूर्व आरोग्याची काळजी कशी घ्यावी? 

परीक्षापूर्व आरोग्याची काळजी संदर्भात बोलताना डॉ. मीनल सोहोनी म्हणाल्या,‘ अभ्यास करूनही तुम्हाला ताण येत असेल, तर त्याचे योग्य नियोजन केले पाहिजे. परीक्षा म्हणजे तुम्ही केलेला अभ्यास दाखवून द्यायची संधी असते. असे समजा, की परीक्षा म्हणजे एकशो-केसविंडो असते. मग ती जास्तीत जास्त चांगल्याप्रकारे कशी दा्खवता येईल याचा विचार करा. आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन या दोन गोष्टींमुळे तुम्ही ताणापासून मुक्त होता.’ 

योग्य आहार – हलका आणि सकस आहार घ्यावा. खूप जास्त किंवा खूप कमी आहार घेऊ नये. परीक्षेच्या कालावधीमध्ये हातगाडीवरील अथवा हॉटेलमधील खाद्यपदार्थ खाण्याचे टाळावे. 

झोप – खूप पहाटे उठणे किंवा खूप उशिरापर्यंत जागणे या दोन्ही गोष्टी टाळाव्यात. सवय नसताना जागरण करणे अथवा खूप लवकर उठणे या दोन्ही गोष्टींमुळे आरोग्य बिघडू शकते. 

अती ताण नकोच – नियमित अभ्यास करूनही काही विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण येतोच. या टेन्शनमुळे आपले आरोग्य बिघडणार नाही याची काळजी. तुम्ही जो अभ्यास केला आहे, तो तुम्ही उत्तमपणे लिहू शकाल अशी खात्री बाळगा. 

परीक्षा साहित्य वेळेवर घ्या – परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंची खरेदी वेळी चकरा. त्यामुळे आयत्यावेळी धावपळ आणि दमणूक होणार नाही. 

घरचा सपोर्ट हवा– परीक्षेमध्ये अमुक इतके मार्क मिळवच असा दुराग्रह पालकांनी ठेवता कामा नये. परीक्षा म्हणजे सर्वस्व नाही हे लक्षात घ्या. पालकांनी मुलांच्या मेहनतीचे कौतुक केले पाहिजे.या गोष्टींचा मुलांच्या मनावर सकारात्मक परिणाम होतो.

पालक-विद्यार्थी संवाद

विद्यार्थ्यांचा घरातील पालकांशी संवाद होणे फार आवश्यक आहे. आई, वडिल, भाऊ, बहिण आणि बालवाडीतले  विद्यार्थी यांचा एकमेकांशी संवाद होण्यासाठी शिक्षकांनी एक उपक्रम सुरु केला आहे. एका ‘चित्रकार्ड’ यावर कुठलीही गोष्ट पुस्तकरूपाने मांडणे, ती शिक्षक स्वत: मुलांच्या घरी जाऊन पालकांच्या हातात देतात. वास्तविक मुलांमार्फत ही क्रिया होऊ शकते, परंतू मुलांच्या हाताने ते खराब होईल किवा हरवू शकत.चित्रकार्डच्या आधारे घरातील आई किंवा वडिलांनी विद्यार्थ्याला ती गोष्ट सांगणे अपेक्षित असते. या उपक्रमामुळे ते बालकही बोलके होते, चित्रामुळे ती गोष्ट विद्यार्थ्याला व्यवस्थित लक्षात राहते. आई – वडिल अशिक्षित असल्यास मोठे भावंडे गोष्ट सांगू शकतात. उदा. ससा कासवाची गोष्ट, तहानलेला कावळा, कोल्ह्याला द्राक्ष आंबट, रामायण- महाभारत, पंचतंत्र इत्यादी .

या उपक्रमामुळे घराती पालकांशी संवाद साधला जाऊन त्यांचे नकळतपणे शिक्षणही चालू राहते. पालकांनी मुलांशी काय बोलावे हा प्रश्नही उरत नाही. पालकही अनेक गोष्टी मुलांना सांगू शकतात आणि शिक्षकही चित्रकार्डद्वारे अनेक गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवू शकतात. 

मुलांची एकाग्रता–कारणे व उपाय

अभ्यासात किंवा कोणत्याही खेळात काही मिनिटांतच कंटाळा आल्याचे लहान मुलांमध्ये नेहमीच दिसून येते. अशा मुलांमध्ये एकाग्रतेचा अभाव असतो. एकाग्रतेचा अभाव असणा-या मुलांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे मुलांमधील एकाग्रता वाढविणे, ही पालकांसमोरील मोठी समस्या आहे.कायम एकाच गोष्टीवर एकाग्र राहणे, वयस्कर व्यक्तीलाही शक्य नसते, त्यामुळे लहान मुलांकडून पूर्ण एकाग्रतेची अपेक्षा करणे चुकीचे आहे.

खेळाकडे असणारा ओढा, शाळा आणि अभ्यासाविषयी कंटाळा, शाळेविषयी मोकळेपणा हिरावून घेत असल्याची भावना यांचा परिणाम एकाग्रतेवर होत असतो. अलिकडच्या काळाच कार्टून पाहण्याचे आणि व्हीडिओ गेम खेळण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. या दोन्हींचील वेगामुळे मुलांच्या एकाग्रतेवर परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. आहारातील चुकीच्या सवयी, विशेषतः लोहाचा अभाव आणि पुरेशी ऊर्जा निर्माण करू न शकणारे अन्न यांमुळे मुलांमधील एकाग्रता कमी होत असल्याचे दिसून आले आहे.

मुलांची एकाग्रता वाढविण्याचा प्रयत्न करताना, ही समस्या आहे आणि त्यावर उपाय करताना मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण करत नाही, याची काळजी घेणे सर्वांत महत्त्वाचे आहे. अभ्यासातील एकाग्रता वाढविण्यासाठी मुलांमध्ये अभ्यासाविषयी रस निर्माण करणे आवश्यक आहे. मुलांच्या आवडी आणि छंद यातून त्यांचा अभ्यासातील रस वाढविण्याची गरज आहे. मुले एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्षही करू शकतात. अशावेळी मुलांना चुकीच्या गोष्टीसाठी न रागवता, त्यांच्या चांगल्या गोष्टींचे कौतुक केल्यास, त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. एकाग्रता न होणे, यामागे मुलांची स्वतःच्या काही समस्या असतात, हे लक्षात घेतले पाहिजे. त्या समस्यांची उकल करणे, हे सर्वांत आधी आवश्यक आहे.चांगल्या कामांबद्दल मुलांना योग्य बक्षीस द्यायला हवे. अभ्यास करताना टीव्ही बंद ठेवण्याचा कटाक्ष पाळायला हवा.बुद्धीबळ, कथाकथन, आकडेमोडीचे खेळ यांतून एकाग्रता वाढण्यास मदत होते. 

मुलांमधील टिव्ही अॅडिक्शन घालविण्यासाठी

खेडे असो किंवा शहर, आई वडिल आणि मुलगा ही तीनही जण टीव्हीच्या समोर बसून टीव्ही पाहात आहेत, हे चित्र अगदी सर्रास दिसून येते आहे. मुलांनी त्रास देऊ नये, पटकन जेऊन टाकावे म्हणून सुरुवातीला टीव्हीसमोर बसून जेवण्याचे आमिष दाखविले जाते. पण नंतर मात्र, ही गोष्ट सवयीमध्ये कधी बदलते याचा पत्ता लागत नाही. कार्टुन चॅनेलवर दाखविण्यात येणाऱ्या अनेक कार्टुनमध्ये दाखविण्यात येणारा हिंसाचार मुलांच्या वागण्यातही दिसायला लागतो. भीमासारखा लाडू खाल्ला की दुसऱ्याला ठोसा मारायची शक्ती येते, इतकीच गोष्ट मुलांच्या लक्षात राहते. त्यामागचा विचार मुलांना समजण्याइतकी मुले मोठी नसतात. टीव्ही अती पाहण्यामुळे मुलांचा अभ्यास आणि आरोग्य या दोन्ही गोष्टींवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मुलांमधील टीव्हीचे व्यसन कमी व्हावे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. 

वेळावर नियंत्रण - मुलांनी टिव्ही पाहूच नये अशी सक्ती केल्यास मुले टिव्ही पाहणे सोडणार नाहीत, हे लक्षात ठेवले पाहिजे. मुलांनी टिव्ही किती वेळ पाहावा यावर पालकांचा कंट्रोल असायलाच हवा. पालक जो कार्यक्रम पाहतील, तो कार्यक्रम साहजिकपणे मुलेही तोच कार्यक्रम पाहतात. त्यामुळे स्वतः पालकांनीच टिव्ही पाहण्याच्या वेळावर नियंत्रण ठेवले पाहिजे. ठराविक वेळ झाल्यावर टिव्ही बंद करण्याची सवय मुलांना लावण्याचा प्रयत्न करावा.  मुलांसाठी वेळ द्या – अनेकदा पालकांना वेळ नाही म्हणून टिव्ही लावण्यात येतो. ही गोष्ट कटाक्षाने टाळली पाहिजे. मुलांसाठी तुमचा दिवसामधला काही वेळ राखून ठेवा. त्यांच्याशी खेळा, त्यांच्याशी बोला. त्यामुळे मुलांशी संवाद साधला जाईल. जेवताना टिव्ही नकोच – टिव्हीसमोर बसून जेवण्याने अनेकदा जेवणाकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे जेवताना टिव्ही नकोच.  अवांतर वाचन आणि खेळ – संध्याकाळी अनेक ठिकाणी मुलांसाठी खेळ आणि व्यायाम घेतला जातो. अशा एखाद्या मैदानावर नाव नोंदविल्यास, टिव्ही पाहण्याचा वेळ आपोआप कमी होतो. त्याचप्रमाणे रोजचा वर्तमानपत्र वाचणे, छोटी गोष्टींची पुस्तके वाचणे या गोष्टी सुरू केल्यास, टिव्ही पाहणे आपोआप कमी होते.

वर्तमानपत्राद्वारे मुलांचा भाषा विकास

मुलांना शाळेतील पुस्तकांच्या वाचनाबरोबर अवांतर वाचन देखील खूप आवडत असते.लहान वयात गोष्टी,गाणी,कविता ऐकायची आणि वाचायची सवय मुलांना लावली तर मुलांच्या भाषेचा विकास सहज व सोप्या पद्धतीने होऊ शकतो. मुलांमध्ये वाचनाचे कौशल्य विकसीत करण्यासाठी अवांतर वाचनाची सवय ही वर्तमानपत्राच्या वाचनातून विकसीत करणे ही फायदेशीर गोष्ट ठरू शकते.

श्री.विकास काटकर यांनी सोलापूर येथील आपल्या शाळेत कार्यानुभवाच्या तासाला मुलांच्या मदतीने ज्ञानगंगा नावाचा उपक्रम राबवला.यात प्रामुख्याने वर्तमानपत्राचे वाचन हा महत्वाचा कार्यक्रम त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने पार पाडून मुलांमध्ये वाचनाची आवड जोपासली.शाळेत येणाऱ्या वर्तमानपत्रामधील महत्वाच्या विषयांची कात्रणे काढून मुलांच्या मदतीने कार्यानुभवाच्या तासाला ही कात्रणे त्यांनी एका वहीत चिकटवून घेतली.यातून एक छोटेसे वाचनालय तयार झाले व मुले पण आपल्या घरी येणारी वर्तमानपत्रे काळजीने वाचू लागली. त्यात त्यांना चांगली माहिती मिळाली तसेच त्यातील महत्वाची कात्रणे काढून शाळेतल्या वहीत चिकटवू लागली.या वर्तमानपत्रात आलेल्या कथांमधून काही कथा वाचून पाठ करून परीपाठाच्या वेळी सांगू लागली. त्यातून त्यांचा वाचनाचा छंदही वाढला.मुलांमध्ये मनोरंजनातून भाषाविकास करण्यासाठी काटकरांनी विनोद स्पर्धा आयोजित केली. वर्तमानपत्रातून आलेले विनोद मुलेया स्पर्धेत सांगू लागली.

वर्तमानपत्रातील सांगा पाहू? ओळखा पाहू?जरा डोके चालवा अशा कोड्यांच्या वापराने  मुलांचे सामान्यज्ञान वाढते तर आरोग्य या सदराचा उपयोग शारिरीक शिक्षण, आरोग्य, आहार यासाठी खूप चांगल्या प्रकारे होतो.दिनविशेष हे सदर वर्षभरातील थोर पुरुषांची जयंती,पुण्यतिथी समजून कार्यक्रम साजरा करायला खूप उपयोगी पडते.संस्कारधन, विज्ञानसंस्कार,थोरांचे बोल याचा देखील चांगला फायदा होतो.शिष्यवृत्तीच्या परीक्षेला बसलेल्या मुलांना देखील या उपक्रमाचा लाभ चांगल्या प्रकारे होतो. शब्दकोडी सोडवल्याने शब्दसंपत्ती व सामान्यज्ञानात भर पडते.अशा प्रकारे वर्तमानपत्राद्वारे मुलांचा हसतखेळत भाषिक विकास सहज सुलभ साधता येतो.

अभ्यास कसा करावा


शैक्षणिक यश मिळविण्यासाठी अभ्यास किती वेळ करावा यापेक्षा अभ्यास कसा करावा हे अधिक महत्वाचे आहे. अभ्यासाचा मानसिक ताण निर्माण होऊ नये तसेच शिकलेल्या गोष्टी दीर्घकाळ लक्षात राहाव्यात यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.अभ्यासाच्या चुकीच्या पद्धतीमुळे देखील अपयश येत असते. दिवसरात्र अभ्यास करणे महत्वाचे नसून एकाग्र चित्ताने आणि निग्रहाने अभ्यास करणे गरजेचे असते.
संदर्भयुक्त अभ्यास : केवळ पाठांतरावर भर देण्याऐवजी ‘तपशीलवार अभ्यासा’(Elaborative learning)ची सवय लावून घ्यावी. त्यासाठी एखाद्या शब्दाचे विविध अर्थ आणि उपयोग शब्दसंग्रहातून शोधून काढणे, पाठ्यपुस्तकातील एखाद्या गोष्टीचे इतरत्र संदर्भ शोधणे, गणित, विज्ञान अशा विषयातील तत्वे प्रत्यक्ष व्यवहारातील गोष्टींमध्ये शोधणे अशा प्रकारच्या कृती करता येतील. त्यामुळे अभ्यासातील रटाळपणा कमी होतो आणि अभ्यासाचा कंटाळा येत नाही. शिवाय एकदा शिकलेल्या गोष्टी दीर्घकाळ स्मरणात राहतात.
अभ्यास चर्चा ग्रुप : अभ्यास शक्यतो एकटेपणी न करता समवयस्क मित्रांसोबत करावा. अभ्यासाबद्दल मित्रांसोबत चर्चा करावी. चर्चा हा ‘तपशीलवार अभ्यासा’चा अजून एक प्रभावी मार्ग आहे. इतरांशी चर्चा करताना किंवा त्यावर इतरांची मते ऐकताना एकदा वाचलेल्या गोष्टींची पुनरावृत्ती होते. त्यामुळे गोष्टी सहजपणे स्मरणात राहतात.
क्षणभर विश्रांती : शिकण्याची प्रक्रिया ही मुख्यतः मेंदूच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते. त्यामुळे शिकण्याची प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी मेंदूचे स्वास्थ्य अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी पुरेशी झोप घेणे, मानसिक ताणतणाव टाळणे, मोकळ्या वेळात खेळ खेळणे, आपले छंद जोपासणे आवश्यक आहे.   
ताजेपणा आणि प्रसन्नता : शक्यतो सकाळच्या प्रसन्न वातावरणात अभ्यास करावा. सकाळच्या वेळेत मेंदू सर्वाधिक कार्यक्षमपणे काम करतो. त्यामुळे सकाळच्या वेळेत अभ्यास करणे लाभदायक ठरते.
आनंददायी व ज्ञानदायी अभ्यास : अभ्यासाकडे केवळ शालेय परीक्षा पास होण्याच्या दृष्टीने न पाहता, अभ्यास ही ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया आहे हे लक्षात ठेवावे. कारण अभ्यासाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदल्यामुळे अभ्यासाची पद्धतही बदलते आणि भविष्यातील स्पर्धेत टिकण्यासाठी त्याचा फायदा होतो.

शिक्षकांचे संवाद कौशल्य

काही शिक्षक हे दिसायला अगदी साधारण असूनही विद्यार्थ्यांमध्ये मात्र अत्यंत प्रिय असतात. विद्यार्थी त्यांच्या येण्याची, त्यांच्या तासिकेची आतुरतेने वाट पाहत असतात. तर काही शिक्षक हे अत्यंत हुशार असूनही विद्यार्थ्यांमध्ये मात्र तितकेसे प्रिय नसतात. याचे प्रमुख कारण म्हणेजे शिक्षकांचा विद्यार्थ्यांशी असलेला संवाद. उत्तम संवाद कौशल्य असलेले शिक्षक हे विद्यार्थ्यांचे मन जिंकून घेतात. त्यांना समजून घेऊन त्यांचं मार्गदर्शन करतात आणि म्हणूनच त्यांच्यात ते प्रिय असतात. उत्तम संवाद कौशल्य ही एक कला आहे. तो एक प्रकारचा वशीकरण मंत्राच आहे.
शिक्षकी पेशात तर उत्तम संवाद कौशल्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. विद्यार्थी दशेतील विविध काळात शिक्षक आपल्या संवाद कौशल्याने विद्यार्थी कसे सांभाळतात, घडवतात याचा थोडक्यात विचार करू.
लहानपण/बालवाडी: मूळ जेव्हा पहिल्यांदा आपल्या आई, वडील आणि कुटुंबियांच्या प्रेमळ कुशीतून घराबाहेर पडते आणि बालवाडीत जाऊ लागते तेव्हा त्याची समाजातील इतर घटकांशी ओळख करून देण्याचे काम बालवाडी शिक्षिकाच करत असते. याच ठिकाणी त्या बाळाला मित्र आणि शत्रूंची ओळख होते! त्याला समाजात कसे वागावे याचे धडे प्रथमतः येथेच त्याची बाई त्याला देत असते. बालवाडीतील बाईला या सर्व मुलांची आईच होऊन राहावे लागते. त्यांचे रडणे, हसणे, धिंगाणा घालणे सर्वच पहावे लागते. या वेळी जर त्या बाई जवळ या मुलांशी कसा संवाद साधावा आणि कशाप्रकारे त्यांना आपलेसे करून घ्यावे याचे कौशल्य नसेल तर त्या मुलांचा त्या बालवाडीत जीव लागत नाही. मग ती तेथे जाने टाळतात. याउलट जर ती बाई त्या मुलांना गोड बोलून चांगले सांभाळत असेल तर अनेक ठिकाणी मुलं त्याच बाई हव्यात म्हणून आग्रह करतांना दिसून येतात.
माध्यमिक-उच्चमाध्यमिक: हा काळ विद्यार्थ्यांच्या पायाभरणीचा काळ मनाला जातो. या वेळी प्रत्येक विषयातल्या त्यांच्या पायाभूत संकल्पना स्पष्ट होणे महत्त्वाचे असते. शिक्षकांनी चांगल्या संवाद कौशाल्याद्वारे सोप्या भाषेत विध्यार्थ्यांना विषय समजावून सांगितला तर पुढे आयुष्यभर तो त्याला नीट लक्षात राहतो. तो आपल्या मुलांना, विध्यार्थ्यांनाही तो नीट समजावून सांगू शकतो. शिक्षकांमुळेच या काळात शिक्षणाची गोडी लागते वा त्याबद्दल तिटकारा निर्माण होतो. माध्यमिक शिक्षकाची जबाबदारी फार मोठी आहे. विद्यार्थ्यांबरोबरच ते देशही घडवत असतात. यामुळे त्यांचे संवाद कौशल्य अति उत्तम असणे अत्यंत आवश्यक ठरते. 
पदवी-पदव्युत्तर: या काळात विद्यार्थ्यांची वैचारिक बैठक पक्की करण्याचे काम प्राध्यापकांवर असते. ते विद्यार्थ्यावर कसा प्रभाव टाकतात हे येथे अत्यंत महत्त्वाचे आहे. या कला विद्यार्थी प्रत्यक्ष संवादाव्यतिरिक्त प्राध्यापकांच्या वागण्या-बोलाण्यावारुनही बऱ्याच गोष्टी शिकत असतात. तेव्हा या क्षेत्रातील शिक्षकांचे संवाद कौशल्य हे सूक्ष्म पातळीवरही उत्तम असायला हवे. त्यांनी विद्यार्थ्यांशी आपुलकीचे संबंध जोपासावे. त्यांना उत्तम चारित्र्याचे, मर्यादा पालनाचे शिक्षण आपल्या वागण्यातून द्यावे.
अशाप्रकारे विद्यार्थी दशेतील सर्वच पातळ्यांवर शिक्षक हे अत्यंत महत्त्वाची भूमिका बाजावत असतात. त्यांचा विद्यार्थ्यांशी  असलेला उत्तम संवादच विद्यार्थ्यांची सामाजिक, नैतिक आणि आर्थिक उन्नती घडवून आणू शकतो. विद्यार्थ्यांचे वाईट सवयींपासून संरक्षण करू शकतो आणि त्यांच्या जीवनाचे सार्थक करू शकतो.

विद्यार्थ्यांचा सर्वांगिण आणि ज्ञानेंद्रियांचा विकास

मुलांच्या वाढीचे आणि विकासाचे टप्पे योग्य वेळेत, योग्य वयात पूर्ण होणे महत्वाचे असते. तरच विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्यवस्थित प्रकारे होतो. शारीरिक, भावनिक, सामाजिक, बौद्धिक, भाषिक विकास सर्वांगिण विकासाच्या अंतर्गत केला जातो. मुलांच्या  विकासात महत्वाची भूमिका आहाराची असते. सकस आहाराने मुले निरोगी राहून शारीरिकरित्या सुदृढ बनतात.
ज्ञानेंद्रियांचा विकास
डोळेडोळ्याने विद्यार्थी वस्तू ओळखतात, दोन वस्तूंमधील फरक समजतात,विविध रंगाच्या, आकाराच्या, उंचीच्या वस्तू दाखवणे, अशा अनेक प्रकारे शिक्षक त्यांना अनुभव देतात.
नाकवास घेण्यासाठी आणि श्वासोच्छवासासाठी नाकाचा उपयोग होतो. सुगंध आणि दुर्गंध यांतील फरक दाखवणे. फुलांचा आणि अत्तराचा वास घेऊन तो मुलांना  ओळखण्यास सांगणे.
काननिरनिराळे आवाज ऐकणे, सुरेल आवाज, कर्कश आवाज, माणसांच्या आवाजातील फरक दाखवून देणे. पाण्याचा, वाहनाचा, प्राण्यांचा असे अनेक आवाज ओळखण्यास सांगणे.
जीभजीभेवरील ज्ञानतंतूमुळे माणसाला गोड, खारट, आंबट, कडू,आदी चवींचे ज्ञान होते. जीभेवरील ज्ञानतंतूमुळे संवेदना निर्माण होऊन चव कळते. विद्यार्थ्यांना विविध पदार्थ चाखावयास देऊन त्यांना चवींची ओळख आणि फरक समजावून सांगू शकतो.
त्वचात्वचेच्यास्पर्शातून संवेदना कळतात. विविध वस्तूंचे स्पर्श अनुभवण्यास देऊन उदा.  गरम, थंड, ओला, सुका, खरखरीत, गुळगुळीत असे अनेक स्पर्शअनुभव विद्यार्थ्यांना आपण देऊ शकतो.
अशा प्रकारे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होण्यास मदत होते. 

उत्तरपत्रिका (पेपर) लिहीण्याची कला

उत्तरपत्रिका (पेपर) लिहीण्याची कला
परीक्षा म्हणजे आपण जे काही शिकलो, ते उत्तरपत्रिकेत लिहिण्याची कसोटी. तुम्ही जो काही अभ्यास केला आहे, तो सुसंगत पद्धतीने मांडण्याची कलाही तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. पण सुसंगत लिहायचे म्हणजे नेमके काय करायचे याची थोडी सविस्तर माहिती घेऊया.
• लेखन कौशल्याची तत्त्वे
सखोल अभ्यास – परीक्षेसाठी असलेला अभ्यास संपूर्ण करण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यामुळे पेपर लिहिताना अचूक संदर्भ देता येतात. दहावी, बारावी, पदवी या प्रत्येक टप्प्यावरील अभ्यासक्रमामध्ये फरक असतो. दरवेळी काठिण्यपातळीमध्येही वाढ होते. आपले ज्ञान वाढावे यादृष्टीने अभ्यासक्रमाची रचना केलेली असते. त्यामुळे उत्तरे लिहीतानाही सखोल अभ्यास करून चांगले सादरीकरण करण्याचा प्रयत्न करा. परीक्षेतील प्रश्नाचे स्वरूप ऑब्जेक्टिव्ह किंवा सब्जेक्टिव्ह प्रकारचे असू शकते. त्यानुसार विषय समजून घेऊन सविस्तर अभ्यास करणे गरजेचा आहे.
• सादरीकरण उत्तम हवे
एखादे उत्तर विस्तृत लिहिले म्हणजे ते चांगले किंवा खूप मार्क मिळतात असे नाही. उत्तर लिहिताना आपल्याला हा विषय समजला आहे, अशा प्रकारे उत्तर लिहिल्यास जास्त फायदा होतो. उत्तरपत्रिका लिहिताना शक्यतो खोडाखोड करू नये. प्रश्नांच्या क्रमाने लिहीलेली उत्तरे, परिच्छेद, दोन शब्दांमध्ये योग्य अंतर, सुवाच्य अक्षर, रेखीव आकृत्या, आवश्यक तेथे उपनावे, सूत्र किंवा नियम या सगळ्या गोष्टींमुळे उत्तरपत्रिका अधिक चांगली होते. 
मानसिकतेमध्ये बदल
पदवी पातळीवर केवळ गुण (मार्क्स) मिळविणे इतकेच ध्येय ठेवून चालत नाही. अभ्यासासाठी असलेला अभ्यास समजून घेऊऩ शिकणे पुढील करिअरच्या दृष्टीने आवश्यक असते. त्यादृष्टीने उत्तरांचे लिखाण हवे. तुमच्यातला आत्मविश्वास तुमच्या उत्तरांमधून जाणवायला हवा. त्यातून तुम्हाला अभ्यास किती समजला आहे हे परीक्षकांच्या लक्षात येते.
परीक्षा केवळ तुमच्या ज्ञानाची कसोटी असते असे नाही, तर तुमचा दृष्टीकोनही त्यातून तपासला जातो. अभ्यास, त्यातून फापटपसारा न करता लिहिलेली नेमकी उत्तरे, सखोल अभ्यास दर्शविणारे मुद्दे या गोष्टींचे भान पेपर लिहिताना सोडता कामा नये.
प्रश्नपत्रिका सोडवताना मुद्देसूद आणि व्यवस्थित सोडवल्यास त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. 

रविवार, २७ सप्टेंबर, २०१५

अकपसंख्यांक स्कॉलरशिप फॉर्म  भरण्याची पध्दत

अकपसंख्यांक स्कॉलरशिप फॉर्म  भरण्याची पध्दत
♦www.scholarships.gov.in या साईट वर जाउन प्रथम विद्यार्थी रजिस्ट्रेशन करणे । विद्यार्थयाची TEMP ID मिलवणे ।
♦हा TEMP ID विद्यार्थी चा login id असेल व जन्म तारीख password असेल ।
♦पुन्हा ह्या ID चा वापर करून login होणे ।
♦विद्यार्थयाची माहिती फॉर्म मध्ये भरून save करत जाणे ।
♦तीन पानाची माहिती भरल्या नंतर विद्यार्थयाचे 9 ही दस्तावेज scan करून upload करणे ।
♦विद्यार्थी ID सांभाळून ठेवणे ।
♦मुख्याध्यापक फक्त फॉर्म approved करतील ।
♦scan करून upload करायचे विविध दस्तावेज ।
1) अल्पसंख्यांक असल्याचे घोषणापत्र
2) पालकाचा स्वयंमघोषित income certificate
3) गुण पत्रक व
4) फक्त दोनच पाल्य शिष्यवृत्तीचा लाभ घेत असल्याचे पालकाचे घोषणापत्र
5) विद्यार्थी फोटो
6)बैंक पासबुक
7)school bonafide certificate
8) residential proof
9)आधार कार्ड
फाॅर्म www.scholarships.gov.in या वेबसाइटवर भरावयाचे आहेत.
आवेदन पत्र भरण्याची अंतिम तारीख 31.8.2015 आहे.

जर तुम्ही मुख्याध्यापक लॉगिन वरुण फॉर्म भरत असाल तर 

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिक पुर्व
शिष्यवृत्ती 2015-16
अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती offline xl file डाउनलोड/
अपलोड बाबत.... प्रथम www.Scholarships.gov.in ।
या वेब साईट ला जा नंतर national scholar portal वर
क्लिक करा नंतर उज्वया बाजूला who am । वर
क्लिक करा त्यमधे institution वर क्लिक करा
आपल्या समोर एक विंडो येईल त्यात user id म्हणून
आपल्या शाळेचा udise no टाका नंतर passwaord -
guest123# असा टाका
capcha टाकून log इन करा
नंतर change passwaord करा passwrd change
झाल्यावर succesful changepassward विंडो येईल
त्यावर OK म्हणा. लोग out होईल.
पुन्हा पहिल्यापासून पूर्ण prosidure करा नविन
पासवर्ड टाकून log in करा
डाव्या बाजूला निळया पट्टित offline upload xl
file वर क्लिक करा समोर download वर क्लिक करा
फाइल डाउनलोड होईल नंतर फाइल ओपन करा
काहीही change न करता पूर्ण माहिती विहित
नमुन्यात भरा व अपलोड करा.
https://www.scholarships.gov.in/main.do #
General Instructions to Upload Excel File.
1.Please use the .xls format only for uploading.
2.Download the sample format i.e click on
Download Excel Format link.
3.Save excel file and fill student data,then upload
into website.
4.Don't change the column header names and
columns positions in excel sheet.
5.Aadhaar Number field is not mandatory,
remaining all fields are Mandatory.
6. Please enter only School code in column Name
of School.(If you enter school name then excel file
won't be uploaded. You can find the school code
from Locate Institutes Service.)
for detail see

Popular Posts

शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण

 शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण  DOWNLOAD