महाराष्ट्रातील ज्ञानेश्वर या महान संताशी एकादशीचा अतूट संबंध जोडला गेलेला आहे. एकादशीच्या आधी सुमारे वीस दिवस आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी बरोबर चालत पंढरपूरला नेतात. या दिंडीत सहभागी होणा-यांना वारकरी म्हटले जाते. विठ्ठलाचे भक्तीत दंग झालेले वारकरी एकतारी व टाळ, झांजांच्या तालावर तुकोबा, ज्ञानेश्वरांचे अभंग गात ही पालखी खांद्यावरून पंढरपूर पर्यंत चालत नेतात. गळयात तुळशीच्या माळा घालतात व कपाळी गंध लावतात. एकादशीचे दिवशी पंढरपूरला मोठी यात्रा भरते. महाराष्ट्रभर या दिवशी उपवास केला जातो. देवाला फराळाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखविला जातो. गावोगावच्या मंदिरात भजन-कीर्तने होतात. महाराष्ट्रातील संत संप्रदायाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा सण होय. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील हा तळागाळातील लोकांपर्यंत पोचलेला अनन्यसाधारण महत्त्वाचा सण होय.
Pages
- Home
- प्रगतीपुस्ताकातील नोंदी
- शालार्थ help videos
- शासकीय संकेतस्थळे
- इयत्ता १ लि ते ८ वि पाठ्यपुस्तके pdf मध्ये
- डाउनलोड करा
- मीना-राजू मंच
- आमच्या शाळांविषयी महिती
- शालेय घंटीचे वेळापत्रक :--
- विविध शालेय स्पर्धा परीक्षा
- थोरांचे जीवनपट
- शासन निर्णय
- राष्ट्रगीत(MP३) मध्ये :-
- यशस्वी होण्याचे नियम
- बालगीते
- शारीरिक शिक्षण -शालेय उपक्रम
- प्राथमिक शिक्षक नियमावली
- विद्यार्थी लाभाच्या योजना
- वार्षिक नियोजन
- आकारिक मूल्यमापन
- संकलित मूल्यमापन
- शालेय पोषण आहार
मंगळवार, १० मार्च, २०१५
पालखी सोहळा
Popular Posts
शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण
शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण DOWNLOAD